बळीराजाची करुण कहाणी
गातो पवनाकाठ
"खाकी'नंतर "खादी'नेही
पुरी लावली वाट !
'रक्षक झाले भक्षक' म्हणुनी
कुणी करी गर्जना
'लोकशाहीचा एन्काऊंटर हा..!'
कुणी करी वल्गना
पाण्यासाठी केले त्यांनी
रक्ताचेही पाणी
मावळच्या खोऱ्यात रंगली
राजकारणी गाणी !
पाठीवरती लाठ्या आणि
छातीवरती गोळी
किती लढावे तरी राहते
रिकामीच ही झोळी...!
- दुर्गेश सोनार ( ११ ऑगस्ट २०११ )
No comments:
Post a Comment